सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

असे का ?

सामाजिक परिवर्तन होत असलेल्या भारतीय समाजात दोन वर्ग दिसून येतात. एक परंपरेच्या नावाखाली चाललेल्या शोषणाला संस्कृती आहे, जतन केले पाहिजे म्हणून धडपडतो तर दुसरा वर्ग जो या शोषणाला कायम बळी पडत आला असून आता जागृत होऊन या बाबीला विरोध करतो .
आजकाल शिकलेले विशेषता लोककलेमध्ये उच्च शिक्षण घेतलेले हि कला नष्ट होत आहे म्हणून फार चिंतीत दिसतात. लोककला म्हणजे काय तर जागरण, गोंधळ, जोगवा मागणे इत्यादी. हे असे असेल तर वाघ्या- मुरली, जोगतिनी, देवदासी पण जिवंत ठेवाव्या लागतील.
ज्यांना वाटते संस्कृती टिकून राहावी त्यांनी ती टिकावी म्हणून आपला बळी द्यावा, इतरांना त्यांचे कर्तव्य शिकवू नये.
काय सामाजिक परिवर्तन झालेल्या घरातील आई- वडील आपल्या पाल्याला या लोककलेचा भाग होऊ देतील?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा