सोमवार, ५ डिसेंबर, २०११

“प्रिव्हेंशन ऑफ अँट्रॉसिटिज अ‍ॅक्ट” ही ‘त्यांना’ समस्या का वाटते?

मिर्चपुर जातीय अत्‍याचार
      नुकताच दिल्ली विशेष न्यायालयाने “प्रिव्हेंशन ऑफ अँट्रॉसिटिज अ‍ॅक्ट” अंतर्गत चालविल्या गेलेल्या मिर्चपुर जातीय अत्याचार खटल्याचा निकाल दिला. २१ एप्रिल २०१० रोजी हरियाणातील मिर्चपुर गावातील जाट जातीच्या ९८ लोकांनी वाल्मिकी या अनुसूचित जातीच्या वस्तीवर हल्ला केला होता. या जातीय हल्ल्यात ७० वर्षीय ताराचंद व त्यांच्या अपंग मुलीला जीवंत जाळण्यात आले होते. हा जातीय अत्याचार असल्याने या गुन्ह्याची नोंद “प्रिव्हेंशन ऑफ अँट्रॉसिटिज अ‍ॅक्ट १९८९” नुसार करण्यात आली.
      हा खटला सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत वर्ग केला होता. या विशेष न्यायालयातील न्यायाधीश डॉ. कामिनी लाऊ यांनी या खटल्यावर निकाल दिला. निकाल देतांना “अँट्रॉसिटिज अ‍ॅक्ट” मध्ये बदल करुन तो जातीनिरपेक्ष करावा अशी सुचना त्‍यांनी दिली. या सुचनेमध्ये डॉ. लाऊ यांनी म्‍हंटले की दलित व आदिवासींवर सवर्णांनी अत्याचार केले तर तो अपराध ठरविणारा व त्यासाठी शिक्षेची तरतूद करणारा हा कायदा बदलावा व तो जातीनिरपेक्ष करावा.

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०११

देवदासी सोडण्याची कारणे

"देवदासी शोध आणि बोध" या वसंत राजस लिखित पुस्तकातील हे एक प्रकरण. या पुस्तकात लेखकाने देवदासी या अनिष्ट प्रथेवर सर्व अंगानी प्रकाश टाकला आहे. सामाजिक बदलासाठी काम करणार्‍या सर्वांनी अभ्यासावे असे हे संग्रही पुस्तक आहे. आजही काही विशिष्ठ समाजात अंधश्रद्धेमुळे आपल्या मुला-मूलींना देवाला सोडण्यात येते. या कृत्याला कायद्याने बंदी असली तरी काही लोकं आपल्या स्वार्थासाठी या अशा रुढी-परंपरांना जीवंत ठेवण्याचे काम करतात आणि अशिक्षीत,अज्ञानी समाज त्याला बळी पडतो.या प्रकरणात लेखकांनी देवदासी सोडण्याच्या धार्मिक,सामाजिक आणि आर्थिक कारणांवर माहिती दिली आहे.







शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०११

बौद्धांच्या ब्राह्मणीकरणाला जबाबदार कोण?

१४ ऑक्टोबर १९५६ अशोकाविजयादशमीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो शोषित, पिडित अस्पृश्य बांधवांना विषमतेवर आधारित ब्राह्मणीधर्मातून बाहेर काढून समानतेवर आधारित बौद्ध धम्माची दिक्षा दिली. त्यांनी धम्मदिक्षेसोबत २२ प्रतिज्ञा दिल्या. तेव्हाच्या शोषित, पिडित अस्पृश्य बांधवांनी या बदलाचा स्विकार सुद्धा केला. २२ प्रतिज्ञांचे पालन करण्यासाठी आपल्या घरातील दगड-धोंड्याचे देव फेकून दिले, स्वतः अशिक्षित असले तरि या पिडित समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले तत्त्व “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” आत्मसात केले. आपल्या मुलांना शिक्षण दिले, त्यासाठी वाट्टेल ते कष्ट सहन केले, मोलमजुरी केली पण मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिली. तसेच अन्न, वस्त्र निवारा या मुलभुत अधिकारासोबत शिक्षणाचा सुद्धा अधिकार दिला. शिक्षणामध्ये फि माफी, शिष्यवृत्ती मिळाली. शिक्षण मिळाले, नोकर्‍या सुद्धा मिळाल्या, काहींनी व्यवसाय केले, अशा विविध मार्गाने या शिक्षित लोकांकडे आर्थिक सुबत्ता आली. ब्राह्मणी धर्मव्यवस्थेने ज्यांना समाजात चपलेचे स्थान दिले होते, त्यांना या धर्मांतरामुळे सन्मानाचा जिवनमार्ग मिळाला.

मानसिक दडपणातून घडणार्‍या आत्महत्या की सामाजिक हत्या?


दैनंदिन वर्तमानपत्र वाचत असतांना एखादी तरी आत्महत्येची बातमी आपण वाचत असतो. कधी फक्त त्यावर नुसतीच नजर टाकतो, तर कधी वाचतो. वाचल्यावर आपण त्याबद्दल हळहळ व्यक्त करायला विसरत नाही. काही वेळा ही आत्महत्या सामुहिक स्वरुपाची असते, अश्या वेळी बरिच चर्चा वेगवेगळ्या गटात होत असते. “एखाद्या व्यक्तीने आपले आयुष्य स्वत:च्या हाताने संपविणे म्हणजे आत्महत्या”, अशी आत्महत्येची सर्वसाधारण व्याख्या मानली जाते. बहुतांश आत्महत्या या मानसिक दडपणातून वा तणावामुळे घडतात, असे वर्तमानपत्रातील बातम्यांवरून दिसून येते. कधी या आत्महत्येची कारणे काय? याची उत्तरे देऊन जातात, तर कधी अनेक अनुत्तरित प्रश्ने देऊन जातात.